परिचय - जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठजल), महाराष्ट्र राज्य
जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठजल), महाराष्ट्र राज्य येथे तुमचे स्वागत आहे. विश्वसनिय जलशास्त्रीय माहिती प्रणाली विकसित करून तिची यशस्वीपणे अमलबजावणी करणे, हा जलविज्ञान प्रकल्पाचा मुख्य उद्दिष्ट आहे. त्याकरीता जलहवामान केंद्रांच्या पायाभूत सुविधांची सुधारणा व सबलीकरण करणे, सहभागी मनुष्यबळाला मोठ्याप्रमाणात प्रशिक्षण देणे व तसेच आधार सामग्रीचे संगणकीकरण करून अर्थपूर्ण विष्लेषण करणे व उपभोक्त्यांना आधार सामग्री वितरीत करणे.
सन १९९५ ते सन २००३ या कालावधीमध्ये राज्यात जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-१ ची अमलबजावणी करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत मुख्यत: जलहवामान केंद्रांचे जाळे प्रस्थापित करण्यात आले. सदर प्रकल्पासाठी एकूण खर्च रु. ६३.५२ कोटी इतका झाला.
सन २००६ ते सन २०१४ या कालावधीमध्ये राज्यात जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-२ ची अमलबजावणी करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत मुख्यत: कृष्णा व भीमा खोऱ्यासाठी एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली (Real Time Data Acquisition System-RTDAS) व पूरांचे अंदाज व धरणातील पाण्याचे परिचालन प्रणाली ( Real Time Stream flow Forecasting & Reservoir Operation System : RTSF & ROS) विकसित करण्यात आली. प्रकल्पासाठी एकूण खर्च रु. ३७.२६ कोटी इतका झाला.
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र. १ व २ च्या यशस्वी अंमलबजावणी नंतर भारत सरकारने राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प (National Hydrology Project-NHP) ला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये मुख्यतः महाराष्ट्र राज्यातील कृष्णा खोऱ्यातील पंचगंगेच्या उर्वरित भागासह संपूर्ण महाराष्ट्रात एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली (Real Time Data Acquisition System-RTDAS) उभारणी करावयाची आहे.
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-१ (ज.प्र.ट.-१)
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र. -१ जागतिक बँकेच्या मदतीने नोव्हेंबर १९९५ साली क्रेडिट नंबर २७७४-इन अतंर्गत सुरु झाला. भारतातील महाराष्ट्र राज्यासह सहभागी १३ इतर राज्य व ८ केंद्रीय संस्थांसाठी विश्वसनिय जलशास्त्रीय माहिती प्रणाली विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. जलहवामान मापदंड मोजणे व संकलित करणेसाठी पायाभूत सुविधा पुरविणे आणि आधार सामग्रीचे दृढीकरण,साठवण व वितरण करणेसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज सहज उपलब्ध होईल असे युजर फ्रेंडली डेटाबेस तयार करणे, इत्यादी गोष्टींचा जलशास्त्रीय माहिती प्रणालीमध्ये समावेश होतो.
भारताच्या जलधोरणाचे विशेषत: जलस्त्रोताची विभागणी, नियोजन व व्यवस्थापन इत्यादी गोष्टी जलशास्त्रीय डेटाबेस विकसिकरणावर अवलंबून आहेत. संकल्पक व संशोधक सदर प्रणालीद्वारे प्राप्त माहिती चा वापर करून वेगवगळे निर्णय घेतात किंवा धोरण ठरवितात. दीर्घकालीन नियोजन अथवा जलस्त्रोतीय रचनांच्या संकल्पनासाठी जलस्त्रोताचे अभ्यास करणे व इतर संबंधित निर्णय घेणे गरजेचे आहे.
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-१ मधील सहभागी राज्य
|
|
|
सहभागी केंद्रीय संस्था
|
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-२ (ज.प्र.ट.-२)
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र. -२ चे घटक खालील प्रमाणे आहेत
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-३ (राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प-एन.एच.पी)
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-१ व टप्पा क्र.२ चे यशस्वी अंमलबजावणी नंतर, तिसऱ्या टप्प्याचे म्हणजेच 'राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प' चे काम मार्च २०१६ पासून मार्च २०२५ या कालावधी करीता हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत कृष्णा व भीमा खोऱ्याकरीता एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. टप्पा-३ मध्ये पंचगंगा उपखोऱ्यात व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अशीच यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये जळगाव येथे नवीन जलगुणवत्ता प्रयोगशाळा उभारण्याचे प्रयोजन आहे. सद्यस्थितीतील जलगुणवत्ता प्रयोगशाळेचे आणि विभागीय व उपविभागीय कार्यालयांचे नुतनीकरण करणे व त्यांना सुसज्ज करणे. तसेच प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करून संस्था सबलीकरण व मनुष्यबळ वर्धित करणे, इत्यादी गोष्टींचा राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पात समावेश आहे. जलसंसाधन मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार यांनी महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत दि.१६ डिसेंबर, २०१६ च्या पत्रान्वये रु.१५०.०० कोटी इतके उदिष्ट निश्चित केले आहे.
जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र. -३ (राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प) चे घटक खालील प्रमाणे आहेत
आधुनिकीकरण करणे
मुल्यांकन करणेसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे ‘रिवर बेसिन अकाउंटिंग सॉफ्टवेअर’ विकसित