• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

उद्दीष्ट आणि हेतू

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे ध्येय व उद्दिष्टे

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत पाणी उपलब्धतेसाठी सद्यस्थितीतील सनियंत्रण प्रणालीचे मजबूतीकरण करणे, हा एकमेव हेतू नसून पाणी वापराचे सनियंत्रण करणे, एकात्मिक जल स्त्रोताचे व्यवस्थापन करणे आणि एककालिक सनियंत्रण व पुराचे अंदाज बांधणे इत्यादी गोष्टींवर भर दिला आहे.

वरील ४९ सहभागी संस्था पैकी महाराष्ट्र (भूपृष्ठ जल) व महाराष्ट्र (भूजल) ह्या महाराष्ट्र शासनाच्या  २ सहभागी संस्था आहेत. महाराष्ट्र भूपृष्ठ जल हा घटक जलसंपदा विभाग व महाराष्ट्र भूजल हा घटक पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग राबवीत आहे.

सदर प्रकल्पामध्ये एकूण ४९ इम्प्लिमेंटिंग एजन्सी चा सहभाग असून त्यापैकी नऊ केंद्रीय संस्था (जलसंसाधन मंत्रालय MoWR नदी विकास व गंगा सरंक्षण विभाग भारत सरकार- RD & GR , केंद्रीय जल आयोग-CWC, केंद्रीय भूजल बोर्ड- CGWB, राष्ट्रीय जलविज्ञान संस्था-NIH, केंद्रीय प्रदूषण नियंत्रक बोर्ड-CPCB, भारतीय सर्वेक्षण विभाग-SoI, राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र-NRSC आणि केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्र-CWPRS) व ३७ राज्य स्तरीय एजन्सी आणि २ नदी खोरे संघटना-RBO इत्यादीचा समावेश आहे.   

 

 

 

 

 

सदर प्रकल्पामध्ये भारतातील सर्व मुख्य नद्यांच्या खो-यांचा समावेश असून या प्रकल्पास केंद्र व राज्य शासनामध्ये घनिष्ठ सहयोग व सहकार्य असणे आवश्यक आहे.

 

 

प्रकल्पाचे चार घटक आहेत

 

  1. घटक 'अ' : जलस्त्रोत सनियंत्रण प्रणाली / नवीन व सद्यस्थितीतील जलहवामान केंद्राच्या जाळ्याचे

                आधुनिकीकरण करणे

  1. घटक 'ब':   जलस्त्रोत माहिती प्रणालीत सुधारणा (राज्य- जलस्त्रोत माहिती प्रणालीचे विकसन व अनुषंगिक   

             बाबी)

  1. घटक 'क':  जलस्त्रोताचे परिचालन व नियोजन:सहभागी संस्थांना मानांकीत कार्यपध्तीने जल नियोजनाचे  

                मुल्यांकन करणेसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे ‘रिवर बेसिन अकाउंटिंग सॉफ्टवेअर’ विकसित

  1. घटक 'ड':   संस्था सबलीकरण करणे व मनुष्यबळ क्षमता वाढविणे

 

शेवटचे सुधारित केले: १३ जून २०२५