राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची पार्श्वभूमी
जलसंसाधन, नदीविकास व गंगा सरंक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी जलविज्ञान प्रकल्प टप्पा १ व टप्पा २ नंतर जलविज्ञान प्रकल्प टप्पा-३ म्हणजेच राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प प्रस्तावित केले आहे. जलस्त्रोताचे नियोजन, विकास व व्यवस्थापन इत्यादी सुधारणे करीता, तसेच पुराचे अंदाज व जलसाठ्याचे परिचालन एककालिक पद्धतीने करणेकरीता, भारत सरकारच्या पुढाकाराने व प्रयत्नाने जलविज्ञान प्रकल्प हा कार्यान्वित झालेला आहे. जलविज्ञान प्रकल्प दोन टप्प्यात (टप्पा-१ कालावधी : १९९५ ते २००३ आणि टप्पा-२ कालावधी : २००६ ते २०१४) पूर्ण झालेले असून या प्रकल्पाने भारतात सुसज्ज जलशास्त्रीय माहिती प्रणालीचा कणा स्थापित केला आहे. सदर प्रकल्पांतर्गत शास्त्रीय पद्धतीने दृधीकृत झालेले, सगळ्यांना स्वीकारण्याजोगे व विस्तृत जलशास्त्रीय रेकॉर्ड जलचक्रातील सर्व बाबींचा समावेश करून उपलब्ध झाले आहे. देशांतर्गत जलहवामान व भू-जलशास्त्रीय सनियंत्रण प्रणाली सुधारणे व मानांकीत करणे या कामाव्यतिरिक्त विविध नदी खो-र्यांमधील जलस्त्रोताच्या विभक्त विकासनापासून जलस्त्रोताचे सुसज्ज नियोजित विकसन व व्यवस्थापनाकडे वाटचाल सुरु झाली आहे व हा अमुलाग्र बदल जलविज्ञान प्रकल्प टप्पा-१ व टप्पा-२ द्वारे घडून आला आहे. जलविज्ञान प्रकल्प टप्पा-१ मध्ये देशांतर्गत मुख्यत्वे मध्य व दक्षिण भागातील नऊ राज्ये व सहा केंद्र शासित प्रदेश तर जलविज्ञान प्रकल्प टप्पा-२ मध्ये देशातील १३ राज्ये व आठ केंद्र शासित प्रदेश यांचा सामावेश होता. जलविज्ञान प्रकल्प टप्पा-१ व टप्पा-२ मध्ये यशस्वीरीत्या सहभागी होऊन आता जलविज्ञान प्रकल्प,नाशिक हे स्टेट एजन्सी म्हणून राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये भाग घेत आहे
मंजुरी
प्रकल्प कालावधी
प्रारंभ तारीख : १६.०३.२०१७
कालावधी : ८ वर्ष
अंतिम तारीख : ३१.०३.२०२५